Pratibimba

प्रतिबिंब…..

ठ मैल पायी चाललो मग सात तास रांगेत उभा राहून दर्शनाला पोचलो तर xx च्यानी दोन मिनिटात ढकलून दिलं.साधे हात जोडायचीही उसंत नाय रे दिली.माझा एक स्नेही मला सांगत होता.मी म्हटलं गरज काय होती तुला जायची?

परमेश्वर म्हणजे निर्गुण निराकार हे मान्य?

तो म्हणाला,‘मान्य..!’

मग तो ह्या भक्तीच्या सुपरमार्केटस मधे मिळेल का?

‘म्हणजे?’ तो बावरला,

मला सांग हल्लीची ही सो कॉल्ड देवस्थानं म्हणजे दुसरं काय असतं?मुठभर बड्व्यानी एखाद्या देवाला तावडीत पकडावं त्याला सोन्या मोत्यानं मढ्वावं आणि बाजारात बसवावं?मग त्याच्या नावाने जाहिरात बाजी करुन खच्चून पैसा ओढणारी आपली दुकानं थाटावीत?त्यांच्या श्रीमंतीचं हिडीस प्रदर्शन भरवावं.सो कॉल्ड भक्त गण ही मग बाजारात गेल्या प्रमाणे जाहिराती आणि लोकप्रियता पाहुन दुकान निवडणार आणि पाच नारळांच्या बदल्यात नोकरी किलोभर मोद्कांच्या बदल्यात छोकरी दहा तोळे सोन्याच्या बदल्यात एखादं घसघशीत कॉन्टॅक्ट असली निर्लज्ज डील्स त्या जगन्नीयंत्या कडे करणार..मग तिथे जमणा-या मलिद्याच्या मालकी हक्का वरुन अधिकारावरून या भक्तीच्या दलालात रंगणारं राजकारण . त्यात वाद करुन त्यात एकमेकांचे गळे चिरण्यापर्यंत जाणारी त्यांची लालसा.थोड्क्यात जिथे स्वार्थ,लोभ,मोह,द्वेश,इर्षा अशा अनेक भावनांचा महासंग्राम चाललाय अशा ठिकाणी तो सापडेल का?

खरंच रे.नाहीच सापडणार.पण मग कुठे सापडेल तो?

माझ्या मते निस्वार्थ सेवेतुन मिळणा-या आनंदाची परीसीमा म्हणजे परमेश्वर प्राप्ती.कुठल्याही स्वार्थी हेतू विना आपण केवळ माणुसकीच्या नात्याने आपण एखाद्याच्या गरजवंताच्या,पिडीताच्या मदतीला धावून जातो.प्रसंगी आपलं कसब पणाला लावतो.अशावेळी ते काम यशस्वी पणे तडीस नेल्या नंतर त्या व्यक्तीच्या कृतार्थ नजरेत तरळणा-या आनंदाश्रुत पहा.तुला परमेश्वराचं प्रतिबिंब दिसेल.तो दुसरा तिसरा कुणीच नसतो तुमचंच प्रतिबिंब असतं ते.पण काही क्षणांकरता त्याच्या करता तुम्ही परमेश्वर झालेले असता.

खरं तर देव दानव आणि मानव तिघंही अंशात्मक रुपाने आपल्यात असतातच.पण ज्या क्षणी तुम्ही अशी निस्वार्थ सेवकरता झटत असता तेव्हा तुमच्या नकळत हा परमेश्वराचा अंश मोठामोठा होत जातो..तुम्हाला तो दिसतो त्या कृतज्ञ डोळ्यात केवळ एकच क्षण त्या क्षणा करता झटावं. एकदा का त्या क्षणात होणा-या त्या जिवंत अनूभूतीची गोडी तुम्हाला कळली ना की कुठल्याही भक्तीच्या सुपरमार्केट मधे तासंतास ताटकळण्याची गरज उरणार नाही.

1 reply
  1. शिरीन कुलकर्णी
    शिरीन कुलकर्णी says:

    खरं आहे. कबिराने म्हटलं आहे,
    जत्रामें फत्रा बिठाया तीरथ बनाया पानी
    दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*