Rutuheen

ऋतुहीन

शहराला हळवं करत नाही चैत्र पालवी,
शहराला होत नाही कधीच हिरवी रंगबाधा,
शहराच्या पाठीवर उमटत नाही ऋतूंची लिपी…
अन् चैत्र चाहुलींने कंठ फुटल्या पाखराचं गाणं, पोहोचतच नाही
शहराच्या डेसीबल झोकून बधीरलेल्या कानात!!

फुटलेच इथल्या निबर भिंतींना लालुस पोपटी डोळे,
तर ते फोडले जातात व्यावहारिक शहाणपणाने.
सिमेंटच्या कातड्याखाली दबलेल्या मातीचा  दरवळ
मातीखालीच विरुन जातो …!
म्हणून हल्ली प्रत्येक ऋतू, शहर दिसताच दूरुन जातो.
शहर मात्र वहात रहातं डोळे मिटून.
कधी घामेजल्या चिंतांच्या पखाली सांभाळत
तर कधी बेगडी जल्लोषात बेभान होत, यंत्रवत शुभेच्छा देत रहातं ..
चैत्राच्या,वसंताच्या, श्रावणाच्या…!!!
© गुरू ठाकूर

3 replies
  1. सतेजा राजवाडे
    सतेजा राजवाडे says:

    सिमेंटच्या कातड्याखाली दबलेल्या मातीचा दरवळ मातीखालीच विरून जातो …क्या बात है !

    Reply
  2. Manasi Sagdeo
    Manasi Sagdeo says:

    पण ऋतू भिडतात त्या शहरातल्या माणसांच्या मनाला अन् मग तिथे मात्र होते आयुष्याला रंगांची बाधा,
    लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा, भगवा.. मग भासू लागतो प्रत्येक सण हवाहवा..

    Reply
  3. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    अगदी मान्य आहे.. पण सर,शहर वसवली माणसाने, त्यात चकचकीत शहरीपणा आणला तोही माणसानेच.. ह्यात शहराची काय चूक. चूक आहे ती माणसाची, माणुसकी मारून शहराला बकालपणा अणि घाणेरडे बनवले. अश्या वेळी इथे कसे काय ऋतू कळणार? माणसाने सुधारण्याच धारिष्ट्य दाखवला तर शहर ही हिरवीगार होतीलच की… ती होवोत, हीच अपेक्षा अणि सदिच्छा.

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*